शंकर , इंद्र आणि विष्णु ह्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नव्हते तरी ते निसर्ग नियमाने मोठे होत होते . आईचे प्रेमळ छत्र हरवल्या नंतर लवकरच आजीही देवाघरी गेली.
घरातले स्त्री राज्य संपले. मुलांच्या डोक्यावरचे होते नव्हते ते ही प्रेमळ छत्र हरवले. मुले जमेल तसे शिकत होती. अभ्यास केला तर केला . नाही केला तर शाळेत मार खात होते . तारणहार कोणीच नाही.
तात्यांनी आपला दिनक्रम आखून घेतला होता . सोमवार ते शुक्रवार शिकवणी वर्ग . सकाळी ५ ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते रात्री ८. जेवणानंतर शतपावली, बातम्या आणि त्यानंतर निद्रादेवीची आराधना .
शनिवार, रविवार ते शेतीवर जात असत. वडिलांची थोडीफार शेती आणि त्यांच्या काकानी दिलेली शेती. तात्या आपले मन तिथे रमवायचा प्रयत्न करत होते .
मुलं मोठी होता होता शिकत होती ........ शिकता शिकता मोठी होत होती.
शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणापेक्षा अनुभवाच्या शाळेत जास्त शिकत होती . घरात मोलाने ठेवलेल्या बाईने रांधलेले निमुट गिळत होती . आवडीनिवडीचा प्रश्नच नव्हता.
हा पण वाड्यात भाड्याने राहणार्या एखाद्या कुटुंबातील मातेचे वात्सल्य उफाळून आले तर प्रेमाचे दोन शब्द वाटेला येत होते .
मुलं बाहेर प्रेम शोधत होती. दिवसच्या दिवस घराबाहेर राहत होती. सगळ्यांच्याच मनात एक विचित्र अढी घर करून होती . तात्या निर्विकारपणे सगळ्या घटनांना सामोरे जात होते.
मात्र शिकवणी वर्गातला एखादा विद्यार्थी प्रावीण्य मिळवून पास झाला की त्याचे भरभरून कौतुक करायला ते कधीही चुकत नव्हते .
काय त्यांचे मन आपल्या मुलांची तुलना ह्या यशस्वी मुलांशी करून दुःखी होत होते ? देवच जाणे.
हा हा म्हणता म्हणता शंकरचे शालेय शिक्षण झाले आणि त्याने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला . एकाचे आयुष्य मार्गी लागण्याचे संकेत दिसू लागले होते.
इंद्र आणि विष्णु ही बर्यापैकी मोठे झाले होते.
मोलाने ठेवलेल्या स्वयंपाक करणार्या बाया किंवा आचारी जास्त दिवस टिकत नव्हते. म्हणून इंद्र आणि विष्णु हळूहळू स्वयंपाक करायला शिकले होते. तात्यांच्या वेळा सांभाळून त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांच्या ताटात पडू लागले होते.
वडिलांची काळजी घ्यायला पाहिजे , ही समज यायला लागली होती.
मित्रांची घरे पाहून घर स्वच्छ ठेवण्यासाठी दोघेही राबत होते .
इंद्र आणि विष्णु ह्या दोघात परस्पर सुसंवाद किंवा प्रेमभावना फार क्षीण असली तरी दोघांचा मित्र संग्रह फार मोठा होता.
ह्या मित्रांच्या परिवारात सामावताना बर्याच चांगल्या वाईट गोष्टी त्यांना अनुभवायला मिळाल्या. भविष्याशी दोन हात करताना हे अनुभवाचे गाठोडे कामी येणार होते.
इंद्र आणि विष्णु डोक्याने तल्लख होते. पण योग्य मार्गदर्शक अजूनही त्यांना मिळाला नव्हता . त्यामुळे अभ्यासातली प्रगती प्रगतीपत्रकात दिसत नव्हती.
त्यातल्या त्यात इंद्र फारच माघार घेत होता . नाईलाजाने तात्यांनी १० वी नंतर इंद्राला आर्ट्स कॉलेजला घातले.
विष्णु १० वी नंतर सायन्स कॉलेजला जाऊ लागला होता. पण घर , स्वयंपाक , येणाराजाणारा ह्या सगळ्यात अभ्यासाला दुय्यम स्थान दिल्या जात होते.
त्यामुळे तोही हुशार असूनही एक सर्वसाधारण विद्यार्थी समजल्या गेला .
मध्यंतरीच्या काळात शंकर इंजिनियर झाला. अगदी गुणवत्ता यादीत चमकला . परिस्थितीने गांजलेल्या तात्यांच्या मनाला एक सुखद दिलासा मिळाला.
एरवी तात्या एकटेपण आल्यामुळे थोडे तिरसट वागू लागले होते. त्यातच घरा संबधी कोर्ट कचेर्या मागे लागल्या होत्या.
घर, शिकवणी वर्ग शेती आणि आता कोर्टा मुळे वकीला कडच्या फेर्या ह्यात ते अडकले होते . पैश्याचा नुसता अपव्यय होत होता. त्याच्या बदल्यात मनस्ताप वाटणीला येत होता .
ह्या सर्व पार्श्वभूमीवर शंकरचे यश खरोखरीच मनाला दिलासा देणारे होते.
तात्या पुन्हा नव्याने सुंदर भविष्याची स्वप्ने पाहण्याच्या मोहाला टाळू शकत नव्हते .
काय तात्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकेल ? इंद्र आणि विष्णु ह्या स्वप्नात सुंदर रंग भरू शकतील?
नियतीच्या मनात आणि भविष्याच्या उदरात काय काय लपले होते हे कुणालाच ठाऊक नव्हते .
चला जाऊ या भविष्याकडे पुढच्या भागात ...
तोपर्यंत तुमच्या समीक्षा हेच तात्यांना आणि परिवाराला मिळालेले बक्षीस असेल. द्या त्यांना जरा दिलासा .
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
..............क्रमशः
_/_/_/_/_/_/_/_/_/_/_/_/_/_/_/_/_/_/
ह्या कथेशी जर कोणालाही स्वतः च्या वा जवळच्या कुणाच्याही आयुष्याशी साधर्म्य आढळले तर तो योगायोग समजावा .
Kavyapushpa-kavitri-aanuradha Marathi free literature's and poems love poems छान मराठी पुस्तके उत्तम मराठी छान कथा कादंबरी देखील वाचा, ई-बुक्स Marathi Books, Marathi ebook epustak ई-साहित्य .
Thursday, 4 August 2022
द्वेष: मनाचे एक काटेरी टोक भाग २
Subscribe to:
Post Comments (Atom)
Welcome
संस्कारित नारायणी : सौ. ललिताशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर
ती माणसच निराळी असतात , पूर असतो त्यांच्या स्वभावात, किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात , कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात . हृदय ...
-
मागच्या भागात काय झाले ...... कामाच्या गडबडीत तो तहान, भूक , घर, बाबा, खानावळीचा डब्बा सगळेच विसरला. आठ वाजले तसे प्यून त्याच्या आजूबाजूला...
-
शंकर इंजिनियर झाला, नोकरीला लागला . नोकरी निमित्ताने त्याची वेगवेगळया गावात, शहरात बदली होत असे. आधी शिक्षणामुळे आणि आता नोकरीमुळे सतत बा...
-
नवीन बाळ घरात आले आणि घरातील वातावरण बदलले. वातावरण जरी बदलले तरी स्वभाव कसा बदलणार? फक्त त्या स्वभावाला तात्पुरती मायेची झालर जोडली गेली....
No comments:
Post a Comment