वैभव खूप नाराज होऊन बसला होता . लतिकानी केलेले आकांततांडव आठवून त्याचे मन पुन्हा पुन्हा घाबरून गोठून जात होते .
खर टेंशन तर वेगळेच होते. जर शाह काकांच्या मुलीने त्याला नाकारले तर त्याचे फारच हाल होणार होते. कोणत्या दुसर्या मुलीने त्याचा स्विकार करेपर्यंत त्याला मिळेल ते काम करावे लागणार होते . आईशी आणि श्री शी तो जरी बोलू शकत नसला तरी तरी आई पर्यंत इथली बित्तंबातमी पोहोचली असणारच. ह्या विचाराने तो अजून अजून अस्वस्थ होत होता.
आपल्याच विचारात तो इतका गढला होता की शाह काकानी त्याला दिलेला आवाज त्याच्या पर्यंत पोहोचलाच नव्हता . शेवटी त्यांनी त्याला हालवून आवाज दिला ...डिकरा, ओए डिकरा
वैभव खडबडून जागा झाला आणि पटकन उभा होत म्हणाला .. सॉरी अंकल
धीरुभाई शाह एक अनुभवी , मुरलेला , माणसांचे अंतरंग वाचणारा व्यापारी होता. वैभवची मनस्थिती त्यांनी एका क्षणात जाणली. आणि त्याला हळूहळू आपल्या जाळ्यात ओढणे त्यांनी सुरू केले.
अतिशय प्रेमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले ....
बेटा अशे होतच असते. तने तोह, आनाथी सारी छोकरी मळी जसे.
(तुला हिच्या पेक्षा जास्त चांगली मुलगी मिळेल)
तू नाराज नई थतो (तू नाराज नको होऊ)
वैभवला ह्या क्षणी कुणाच्या तरी आधाराची नितांत गरज होती . त्यामुळे धीरुभाई च्या मधाळ शब्दाने त्याला नव्याने हुरूप चढला.
चला काका , मी तयार आहे तुमच्या बरोबर यायला .
धीरुभाई ने मंदस्मित केले आणि त्याला चलण्याची खूण केली . चालता चालता हळूहळू त्याची माहिती गोळा करत आणि आपली नेमकी माहिती त्याच्यापर्यंत ते पोहचवत राहिले.
आपल्या पत्नीचे नाव कोकिला असून त्यांना दोन मुली असल्याचे त्यांनी वैभवला सांगितले .
मोठी मुलगी रुपाचे लग्न झाले . वर्षभरात त्यांना मुलगा झाला आणि त्यामुळे त्यांना जावईपूरम् च्या नियमानुसार इथून जावे लागले.
सध्या ते अमेरिकेत स्थायिक झालेत.
दुसरी मुलगी नाजूका. आईची अतिशय लाडकी. खूप हुशार . इंजिनियर असलेली . खूप मोठ्या कंपनीत सीईओ असलेली. स्वभावाने अति प्रेमळ .
धीरुभाई चे मिठास बोलणे वैभव ला भुरळ घालत होते .
मारा डिकरिने मराठी वानगियो बऊ भावे छे.
(माझ्या मुलीला तुमचे मराठी पदार्थ खायला फार आवडतात).
हे ऐकून तर तो आनंदाने हसला हे धीरुभाई च्या चाणाक्ष नजरेनी पटकन हेरले होते . बोलता बोलता ते घराजवळ येऊन सुद्धा पोहोचले.
घरात पोहोचताच धीरुभाई ने आवाज दिला , कोकिला...
एका हसतमुख कोकिळेच्या रंगाच्या स्त्रीने भसाड्या आवाजात येते येते म्हणत, आरती च्या ताटा सकट प्रवेश केला.
आल्या आल्या तिने वैभवला ओवाळले . तिच्या नावाचा आणि आवाजाचा अर्था अर्थी संबंध नसल्याचे वैभव ला जाणवून गेले .
कदाचित तिच्या रंगावरून तिचे नाव ठेवण्यात आले असेल असा खट्याळ विचार त्याच्या मनात डोकावून गेला . पण धीरुभाई च्या मिठास बोलण्याचा पगडा अजूनही त्याच्यावर होता. त्यामुळे तो फारसा गडबडला नाही.
मारी डिकरी तने नक्की पसंद करशे (माझी मुलगी तुला नक्की पसंत करेल ) धीरुभाई ने अजून एक साखरेत घोळलेला गोळा फेकला.
मने खात्री छे, तमे मारा डिकरी ने सुखी राखशो.( मला खात्री आहे तू तिला नक्की सुखी ठेवशील).
आता त्यांनी फारच प्रेमाने आपल्यासाठी मुलीला आवाज दिला नाजूका बेटा देख कोण आलाय....
त्या मोठ्या आलिशान हॉल च्या दोन्ही बाजूला असलेल्या भरभक्कम शिसवी जिन्याच्या बाजूने बारीकसा आवाज किणकिणला ...
आली आली पापा...
आवाजाच्या दिशेने वैभव ने पाहिले आणि त्याचे डोळे विस्फारले गेले. हत्तीच्या पिल्लाच्या साईजची नाजूका कसाबसा तोल सावरत त्याच्याकडे येत होती.
तो ताडकन उभा झाला आणि पळू लागला . धीरुभाई ने त्याला पकडले तसा तो गयावया करून ओरडू लागला ...
सोडा मला सोडा ..
जाऊ द्या आईकडे मला ....
मला नापसंत केले तरी चालेल .. सोडा सोडा ..
इतक्यात त्याच्या तोंडावर कोणी तरी पाणी फेकले आणि तो खडबडून जागा झाला . आई त्याच्याकडे घाबरून पहात म्हणाली ..
अरे कशाला ओरडत होता ? कोणी पकडले तुला ? उठ आता , तयार हो . आज तुझा नोकरीचा पहिला दिवस ना ? वेळेत जा.
वैभवने एक निःश्वास सोडला आणि तयारीला लागला .
समाप्त .
©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎
Kavyapushpa-kavitri-aanuradha Marathi free literature's and poems love poems छान मराठी पुस्तके उत्तम मराठी छान कथा कादंबरी देखील वाचा, ई-बुक्स Marathi Books, Marathi ebook epustak ई-साहित्य .
Monday, 18 July 2022
जावईपूरम.. भाग ५
Subscribe to:
Post Comments (Atom)
Welcome
संस्कारित नारायणी : सौ. ललिताशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर
ती माणसच निराळी असतात , पूर असतो त्यांच्या स्वभावात, किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात , कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात . हृदय ...
-
मागच्या भागात काय झाले ...... कामाच्या गडबडीत तो तहान, भूक , घर, बाबा, खानावळीचा डब्बा सगळेच विसरला. आठ वाजले तसे प्यून त्याच्या आजूबाजूला...
-
शंकर इंजिनियर झाला, नोकरीला लागला . नोकरी निमित्ताने त्याची वेगवेगळया गावात, शहरात बदली होत असे. आधी शिक्षणामुळे आणि आता नोकरीमुळे सतत बा...
-
नवीन बाळ घरात आले आणि घरातील वातावरण बदलले. वातावरण जरी बदलले तरी स्वभाव कसा बदलणार? फक्त त्या स्वभावाला तात्पुरती मायेची झालर जोडली गेली....
No comments:
Post a Comment