वामांगी - वाम अंगाला असणारी ती वामांगी. वाम म्हणजे डावा. त्यानुसार डाव्या भागाला असणारी ती वामांगी.
आता कुणाच्या डाव्या भागाला ? पुरुषा च्या म्हणजेच नवर्याच्या डाव्या भागाला अथवा हाताशी असणारी ती त्याची बायको . अनेक शुभ प्रसंगी, पूजा अर्चना करताना गुरुजी सुद्धा सांगतात - बायकोने नवर्याच्या डाव्या हाताला बसा . का ? उत्तर नंतर शोधू या.
आता डावा भाग जो आहे तो नेहमी उजव्या भागापेक्षा थोडा कमकुवत मानतात. कधी कधी वाईट सुद्धा मानतात . उदा. वाम मार्गी म्हणजे वाईट चालीचा अथवा कमकुवत, असहाय्य , कमी शक्तीचा मानल्या जातो. ह्या हिशोबाने वामांगी ही पुरुषा पेक्षा कमकुवत , असहाय्य , कमी शक्ति असणारी स्त्री झाली. पुरुषप्रधान संस्कृतीने सरसकट ह्या विचाराला मान्यता दिली. आणि स्त्री अबला, बलहीन, क्षुद्र, कमकुवत ठरली.
अगदी विरुद्ध अथवा विरोधाभासी विचार पहा....
१. A road sign - For safety follow लेफ्ट side. लेफ्ट side is attributed to शक्ति.
२. वामे शक्ति धरम् - म्हणजे डाव्या हाताला शक्ति धारण करणारा असा तो शिव . सर्व विश्वाचा संहार कर्ता - ओळखल्या जातो आहे पार्वती मुळे - डाव्या भागाला असणार्या शक्ति मुळे . सांगा स्त्री अबला की सबला ?
३. वामे तु जनकात्मजा - म्हणजे कोण ? मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम प्रभू. ओळख कशी ह्यांची. डाव्या बाजूला असलेल्या सीते मुळे . श्रीराम प्रभू ची ही शक्ति आहे. तरीही स्त्री अबला ?
जिजाऊ मातेने संकटाशी सामना करत प्रसंगी तलवार चालवून शिवबाच्या मनी स्वराज्याचे बीज पेरले. ती माता अबला कशी? "श्री, सखी , राज्ञी जयती " असा शिक्का कट्यारीचा मान मिळवणारी येसु बाई राणी सगळ्यानाच ठाऊक आहे.
पुराणातील दाखले , इतिहासातील उदाहरणे आपल्याला सशक्त नारीचेच दर्शन घडवितात. स्वातंत्र्य पूर्व काळातील दाखला द्यायचा ठरविले तर सावरकरांच्या "त्या तिघी " कमी का होत्या ? गरोदर पणाचे नाटक करत जिवंत बॉम्ब पोटाला बांधुन क्रांतिकारकां पर्यंत पोहोचवण्याचे पुण्यकर्म करणार्या अबला नाहीत.
काय ह्या स्त्रीया फक्त आजच्या एका दिवसाच्या मानाच्या भुकेल्या होत्या? निश्चितच नाही.
स्त्री आणि पुरुष एकमेकांना पूरक आहेत. "धर्मे च अर्थे च कामे च मोक्षे च नातिचरामी" असे वचन देणारा पुरुष हे वचन फार लवकर विसरतो . तरी ही शक्तिरूपीणी सगळाच लढा एकटीने देत असते.
जेंव्हा पूजा सांगणारे गुरुजी मंत्रोच्चार करताना स्त्री ला "हाताला हात " लावा असे सांगतात त्यावेळी हे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडावे ह्या साठी त्या स्त्रीच्या शक्तीचा आधार मागितल्या जातो.
म्हणजेच ज्या ठिकाणी स्त्रीची पूजा होते त्या ठिकाणी देवतांचा निवास असतो . ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होत नाही त्या ठिकाणी केल्या गेलेली सर्व चांगली कर्मे निष्फळ होतात.
रावणाचे उदाहरण आपल्याला ठाऊकच आहे. अत्यंत मुत्सद्दी राजकारणी , महापराक्रमी , ज्ञानी, कट्टर शिवभक्त असून सुद्धा स्त्रीचा अपमान करण्याचे घोर पातक त्याच्या हातून घडले होते. त्यामुळे त्याच्या उत्तम गुणांचा र्हास झाला. आपल्या सर्व पुत्रांना गमावावे लागले. अंततोगत्वा त्याचा ही विनाशच झाला.
म्हणून एकच सांगणे स्त्रीचे केवळ एक दिवस पूजन करून भागणार नाही. सदैव तिचे ऋणी रहा. माता , भगिनी, पुत्री, भार्या, स्नुषा ह्या सगळ्या रूपाचा आदर करा.
©️®️ सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित
अप्रतिम लेख...किती सुंदर प्रकारे मांडलाय मुद्दा...👍👍👌👌👌👌✍️✍️✍️✍️✍️🍫🍫🍫🍫🍫🌹
ReplyDeleteसुंदर लेखन केले सखी ✍️🌟👌👍
ReplyDeleteKhup chhan v prgalbha
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteApratim sunder lihile aahe
ReplyDeleteStree chya antarmanatil bhavana achuk mandalya aahe
Khoop chhan