सकाळी सकाळी आईची आरोळी ऐकून वैभव ला जाग आलीच होती . पण तो अजून अंथरूणात तसाच लोळत पडला होता.
बाजूच्या पलंगावर त्याचा लहान भाऊ श्री सुद्धा आईच्या बडबडीने जागा झाला होता . पण तोंडावर पांघरूण घेऊन तो सुद्धा झोपायचे नाटक करत होता.
आज त्याला काहीच करायची इच्छा होत नव्हती. तशीही आता त्याच्या मनाची तयारी करावी लागणारच होती. जावईपूरम् (?) मध्ये जाण्याचे त्याचे दिवस जवळ येत चालले होते. आई फार दिवस आपल्याला इथे राहू देणार नाही , ह्याची त्याला पूर्ण कल्पना होती.
तिकडे आईची तकतक चालूच होती . पोरगा वयात आला . त्याचे लवकर हात पिवळे झाले की माझी अर्धी जबाबदारी संपेल. तो सासरी नांदता पाहिला की दुसऱ्याकडे निवांत पाहता येईल .
श्री च्या वेळेला मुलगी व्हावी अशी आमची दोघांचीही इच्छा होती. पण कसचं काय ?..
....
मुलगाच झाला . ह्यांचे बाबा काय दुसरा ही मुलगाच झाला म्हणून धसका घेऊन संन्यास घेऊन निघून गेले .....
मुलगी झाली असती तर आज आपण ह्या खुराड्यात नाही तर जावईपूरम् च्या आलिशान वाड्यात असतो .....
शिवाय हाताशी माझ्या एक जावई काम करायला राहिला असता .....
आईचे बोलणे असेच अजून किती तरी वेळ चालूच राहिले असते म्हणून वैभव पटकन उठला , ब्रश केला, चहाचे आधण ठेवले आणि आईच्या हातात गरमागरम चहा ठेवला.
समोरचे छोटेसे अंगण झाडून, सारवुन स्वच्छ केले . वृंदावना समोर सुबकशी रांगोळी ही रेखाटली. घरात येऊन पुढची कामे करण्यासाठी तो वळला होताच तोच पोस्टमन ताईने त्याच्या हातात पत्र ठेवले .
पत्र उघडत उघडत तो आत आला . आणि त्याच्या चेहर्यावरचे भाव झरझर बदलू लागले . सरकार कडून आलेले पत्र होते ते...
मुलाचे लग्नाचे वय आता २४ वर्षा वरून २१ वर्ष करण्यात आले होते. आणि ४ दिवसानंतरच वैभव ला २१ वे लागत होते . सरकारने ताबडतोब म्हणजे ८ दिवसात त्याला जावईपूरम् मध्ये हजर होण्याचे आदेश दिले होते ...
पत्रा बरोबर २५ मुलींची यादी ही पाठवली होती . ह्या २५ मुलीनी ह्या स्थळाला पसंती दर्शविली होती.
त्याच्या जन्मापासूनचे सगळे डिटेल्स त्यांच्या पर्यंत आधीच पोहोचले होते .
त्याचे रूप, त्याची काम करण्याची पद्धत, ह्याचे व्हीडिओ वेळोवेळी त्या मुलींच्या आईवडलां पर्यंत पोहोचतच होते. त्याच्या प्रोफाईल वर सतत ए, ए+,ए++ अशाच ग्रेड होत्या .
त्याचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे त्याला नोकरी नव्हती. त्याच्या ह्या गुणावर ५ मुलींनी चक्क त्याला मागणी घातली होती.
हे सर्व त्याने गुपचूप आईच्या स्वाधीन केले. त्याला वाटले आई आता रडकुंडीला येईल. पण असे काहीच झाले नाही . ती हर्षभरीत होऊन धावत पळत शेजारणीला दाखवायला निघून गेली .
वैभव तिथेच डोके धरून खाली बसला..
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
क्रमशः
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
मुलींची घटणारी संख्या हा आज समाजापुढे मोठा प्रश्न आहे . ह्या प्रश्नाने भयानक स्वरुप धारण करण्या आधीच सगळ्यानी जागृत होणे आवश्यक आहे . ह्या प्रश्नाला समजा सरकारने ह्या कथे प्रमाणे उत्तर दिले तर काय गमतीजमती घडून येतील ते वाचा पुढच्या भागात ...
पुढच्या भागात वैभव चे काय होणार ?
जावई पूर मध्ये तो खुष राहील का ?
मना सारखा जोडीदार आणि कमी राबवून घेणारे सासू सासरे मिळतील का ?
की अजून भलतेच काही त्याच्या नशिबात आहे ?
Kavyapushpa-kavitri-aanuradha Marathi free literature's and poems love poems छान मराठी पुस्तके उत्तम मराठी छान कथा कादंबरी देखील वाचा, ई-बुक्स Marathi Books, Marathi ebook epustak ई-साहित्य .
Saturday, 9 July 2022
जावईपूरम्..भाग १
Subscribe to:
Post Comments (Atom)
Welcome
संस्कारित नारायणी : सौ. ललिताशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर
ती माणसच निराळी असतात , पूर असतो त्यांच्या स्वभावात, किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात , कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात . हृदय ...
No comments:
Post a Comment